हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 530 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या सारंग स्वामी यात्रेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या यात्रेच्या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोहचले असून भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या यात्रेत भाजीच्या प्रसादासाठी हजारोंच्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
हिंगोलीतील शिरडशहापूर येथे विरशैव बांधवांचे आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वषार्पासून दरवर्षी मकरसंक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या सारंग स्वामी यात्रेत १०० क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता. या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत आलेल्या भाविकांनी सोबत पोळ्या घेऊन आले होते. या ठिकाणी तयार केलेल्या भाजीचा प्रसाद घेऊन भोजन केले. तसेच अनेक भाविक भाजीचा प्रसाद घरी घेऊन गेले.
यात टोमॅटो, वांगी ,चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी ,करडी, पानकोबी ,फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची ,गांजर ,काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १०० क्विंटल भाज्याचा प्रसाद तयार करण्यात आला. ही भाजी प्रसादाचे भाविकांना नंतर वाटप करण्यात आले. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते.
या यात्रेत विविध धार्मिक वस्तू विक्रीचे दुकाने उभारण्यात आले होते. वीरशैव समाज बांधव शिरडशहापुर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी भाजीच्या प्रसादासाठी पुढाकार घेतला होता. भाजीप्रसाद यात्रेसाठी परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद , जालना जिल्ह्यासह आंध्रप्रदेश कर्नाटक व मराठवाड्यातील भाविक भाजीच्या प्रसादासाठी हजारोच्या संख्येने दाखल झाले.
शिरड शहापूर परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या सारंगवाडी येथे संतश्रेष्ठ सारंग स्वामी यांच्या महाराज वार्षिक यात्रेनिमित्त आज ‘भाजी’ महाप्रसाद वाटप होणार आहे. या निमित्ताने गावोगावच्या दिंड्या दाखल झाल्या असून विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.प.पू. काशिनाथ शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने प. पू. १०८ लिंगायत बसवलिंग शिवाचार्य महाराज (पाथरी) व ष.ब्र. १०८ सद्गुरू प्रभुलिंग शिवाचार्य यांच्या आयोजन महाराज यात्रेचे नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
गत दोन वर्षे करोनामुळे सारंग स्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा भरली नव्हती. यावेळेस करोना संपुष्टात आल्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जात आहेत. प्रथेप्रमाणे याहीवर्षी ‘भाजी’ महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १०:३० या वेळेत स्वामी वाखरीकर यांचे कीर्तन झाले व नंतर . ११ ते १ वाजेपर्यंत धर्मसभा घेण्यात येणार आहे. या धर्मसभेस सांब शिवाचार्य महाराज (थोरला मठ वसमत), डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, रुद्रमुनी शिवाचार्य महाराज, गुरु शिवाचार्य महाराज गिरगावकर, करबसव शिवाचार्य महाराज, गुरु डिगांबर शिवाचार्य महाराज आदी गुरुवर्य उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले.
यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल
यात्रेनिमित्त १८ जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली आहे.यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील मल्ल दाखल झाले आहेत. तसेच परिसरातील गावोगावच्या दिंड्याही यात्रेत स
हभागी होण्यासाठी येत आहेत. यात्रा यशस्वीतेसाठी वीरशैव समाज विश्वस्त समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी सहकार्य केले
यात्रेच्या निमित्ताने चोख पोलिस बंदोबस्त
कोरोनानंतर प्रथमच यात्रा भरत आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील भाविक सारंग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत.त्यामुळे यात्रेत पोलिस बंदोबस्तही वाढविला आहे. पोलिस प्रशासन सर्व कार्यक्रमांवर लक्ष ठेवून आहे.