मुंबई – मोदी सरकारच्या कारभारामुळे देशातील बहुतांश हिंदुच अडचणीत आल्याची सध्याची स्थिती आहे अशी प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी नोंदवली आहे.
येस बॅंक बुडाल्याच्या प्रकरणात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की ओडिशातील जगन्नाथाच्या मंदिराचेही 545 कोटी रूपये येस बॅंकेत अडकले आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या राजवटीत आता देव सुद्धा अडचणीत यायला लागले आहेत असा टोमणाही त्यांनी मारला आहे. सावंत म्हणाले की मोदी समर्थक व भाजपचे नेते आज देशात धार्मिक धृवीकरणाचे राजकारण करून हिंदु संकटात असल्याची आरोळी ठोकत असतात. पण मोदींच्या राजवटीत देशातील हिंदुच अडचणीत आले आहेत ही वस्तुस्थिती आहे.
बॅंकांमध्ये बहुतांशी हिंदुंच्याच ठेवी आहेत त्या असुरक्षित बनल्या आहेत. बॅंकांबुडाल्याने अनेक हिंदु कुटुंबे देशोधडली लागली आहेत त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. याच सरकारच्या राजवटीत पंजाब ऍन्ड महाराष्ट्र सहकारी बॅंक बुडाली. त्यात पैस अडकल्याच्या धास्तीने अनेक खातेदारांनी आपले प्राण सोडले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ला अशा लुटारूंनी ज्यांचे पैसे लुटले ते बहुतांशी हिंदुच होते असे ते म्हणाले. येस बॅंकेत एकूण 18238 कर्मचारी आहेत, त्यातील बहुतांशी कर्मचारी हिंदुच असून त्यांच्या नोकऱ्याही आता धोक्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील 109 बॅंकांचे पैसे येस बॅंकेत अडकल्याने या बॅंकाहीं आता अडचणीत आल्या आहेत. तथापी बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बॅंकेचे येस बॅंकेत ठेवण्यात आलेले 265 कोटी रूपये या बॅंकेवर निर्बंध लागू करण्याच्या आदल्यादिवशी काढून घेण्यात आले. यातून मोदी व शहा यांना फक्त गुजरातची काळजी आहे त्यांनी देशाची काळजी नाही अशी टीकाहीं त्यांनी केली आहे.