मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (का) सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याविरोधात आवाज उठवला आहे.
Here’s what you need to know about why these protests are important. See you on the 19th at August Kranti Maidan, Mumbai. The time to protest on social media alone is over. pic.twitter.com/lwkyMCHk2v
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 18, 2019
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा या कलाकारांनी कठोर शब्दात निषेध केला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने 18 डिसेंबर रोजी ट्वीट करुन सीएएविरोधात आवाज उठवला होता. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणं त्याला आता चांगलंच महागात पडल्याचे दिसतेय. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबादमधील सैदाबादमध्ये त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 121 (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण किंवा प्रोत्साहित करणं), 121 अ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणं), 120 ब (गुन्हेगारी कट रचणं) आणि 505 (समाजामध्ये तेढ निर्माण करणं) अतंर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही तक्रार एका तरुणाने त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. के करुणा सागर असे त्याचे नाव आहे. के करुणा सागर हे पेशाने वकील आहेत. यासोबतच ते हिंदू संघटनेचे अध्यक्षही आहेत. फरहान अख्तरने देशविरोधी ट्वीट केल्याचा आरोप या वकिलाकडून करण्यात आला आहे. फरहानवर देशातील विविध समाजांमध्ये शत्रूत्वाला प्रोत्साहन दिले असल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.