पाकचे कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर सरकारच्या काश्मीरविषयक मुद्यावरून पाकिस्तानचा तांडव सुरू आहे. त्याचाच निषेध वेगवेगळ्या मार्गान पाक व्यक्त करत आहे. दरम्यान, देशात आता दहशतवादी कारवाया करण्याचा पाककडून प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे.
Intelligence Sources:BSF&Indian Coast Guard along with other security agencies on high alert after inputs suggest that Pak trained SSG commandos or terrorists would try to enter Gulf of Kutch and Sir Creek area using small boats. Enhanced vigil and patrolling in the area underway pic.twitter.com/RkzlS4lfeL
— ANI (@ANI) August 29, 2019
कछ परिसरातून ही घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे. भारतात दहशतवादी हल्ला करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा मुख्य हेतू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा सुरक्षा दल आणि भारतीय तटरक्षक दलासोबत सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. अदानी पोर्टस आणि एसईझेड यांनी एक पत्रक जाहीर केलं असून यामध्ये सांगण्यात आलं आहे की, तटरक्षक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने प्रशिक्षण दिलेले कमांडोंनी हरामी नाला खाडी क्षेत्रातून कछ भागात प्रवेश केला आहे. त्यांना पाण्यामधून हल्ला करण्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. गुजरातमधील परिस्थिती बिघडू नये यासाठी सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुंद्रा बंदरावरील सर्व जहाजांना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याचे तसंच सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.