मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. तर धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच 90 टक्के भरला होता. त्यांनतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र आता पर्यटकांना धरणाच्या भीतीवर जाण्यासाठी रोखण्यात आले आहे. तर परिसरात खाजगी गार्ड आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.