नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड संघात शुक्रवारपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने ८ गडी राखून जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावसंख्या उभारली होती. त्यामुळे इंग्लंड संघाला १२५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. इंग्लंड संघाने हे आव्हान १५.३ षटकांत २ गडी गमावून १३० धावा करत पूर्ण केले.
भारतीय संघाकडून या सामन्यात श्रेयश अय्यर वगळता एका ही फलंदाजाला जास्त वेळ टिकता आले नाही. कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेपाठोपाठ या ही सामन्यात अपयशी ठरला. तो अत्यंत चूकीचा फटका खेळून बाद झाला. त्याला साधे आपले खातेसुद्धा उघडता आले नाही. त्याचबरोबर शिखर धवन ४, केएल राहुल १ आणि शार्दुल ठाकुर ० धावांवर बाद झाले.
परंतु भारतीय संघाडून सर्वाधिक धावा श्रेयश अय्यरने काढल्या. त्याने ४८ चेंडूत ८ चौकारआणि एका षटकार लगावत ६७ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर रिषभ पंतने २१ आणि हार्दिक पंड्याने १९ धावा करत आपले योगदान दिले. मात्र या सामन्यात भारताने खराब फलंदाजीचे प्रदर्शन केल्याने भारताला हा सामना गमवावा लागला. तसेच ज्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाचा दबदबा राहिला, त्या ठिकाणी विराट कोहलीने तीन फिरकीपट्टूंना खेळवण्याचा घाट घातला.
यामुळे भारतीय संघाला लाजिरवान्या पराभवाला सामोरे जावे लागले. म्हणून दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे आज आपण या लेखामधून भारतीय संघात कोण- कोणते बदल केले जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया…
दुसऱ्या टी-२० सामन्यात हे दोन मोठे बदल होऊ शकतात
१. शिखर धवनच्या जागी रोहित शर्मा
पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला संधी देऊन विराट कोहलीने सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले होते .कारण रोहित सारख्या दिग्गज खेळाडूला बाहेर बसवने भारतीय संघाला चांगलेच महाग पडले. पहिल्या सामन्यात शिखर धवनला फक्त ४ धावा काढता आल्या .त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माला शिखर धवनच्या जागी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
2.दीपक चहरला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली जाऊ शकते संधी
पहिल्या टी-20 सामन्यात प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला. परंतु भारतीय संघ या सामन्यात तीन फिरकीपटू गोलंदाजांच्या सोबत उतरला होता. त्यामुळे याचा फटका भारतीय संघाला बसला. म्हणून दुसर्या टी-20 सामन्यात एका फिरकीपटूला विश्रांती देऊन त्याच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. त्यांनी 13 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दीपक चहरचा समावेश केला जाऊ शकतो.