संघटनेच्या द्वितीय वर्धापण दिनानिमित्त होणार संसारोपयोगी साहित्याचे वाटप
नगर – भूमिपुत्र शेतकरी संघटणेच्या द्वितीय वर्धापण दिनानिमित्त जिल्ह्यातील आपत्ती ग्रस्त कुटुंबीयांना आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व व्याख्याते गणेश शिंदे यांच्या उपस्थित संसार उपयोगी सहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हा प्रमुख संतोष हांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार रोजी मार्केट यार्ड येथील शेतकरी निवास येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव किरण वाबळे, प्रदेश उपाध्यक्ष असिफ शेख, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, कार्यकारणी सदस्य निलेश तळेकर, युवक जिल्हा प्रमुख अमोल उगले, जिल्हा सरचिटणीस संतोष कोरडे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, सीताराम देठे, गणेश चौधरी, गणेश जगदाळे, रोहिदास धुमाळ आदी उपस्थित होते.
भूमिपूत्र शेतकरी संघटणेचा द्वितीय वर्धापनदिन मार्केट यार्ड येथील शेतकरी निवास येथे मंगळवार दि.4 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, व्याख्याते गणेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील संघटणेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्नांसाठी लढा दिला जात आहे. मागील दोन वर्षात 1 जून चा ऐतिहासिक संप, दुध आंदोलन, कांदा प्रश्नावरील आंदोलन, ऊस आंदोलन, व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. तसेच संघटनेचा प्रथम वर्धापनदिनानिमित्त पारनेर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शेळ्याचे वाटप करून कुटुंबास मदतीचा हात देण्याचे काम संघटनेने केले आहे.
संघटनेचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना संघटनेच्या वतीने मदतीचा हात देणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव देखील करण्यात येणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी सांगितले.
यावेळी राधुजी राऊत, रावसाहेब झांबरे, सचिन सैद, गणेश सुपेकर, सागर भिंगारे, महेश धाडगे, सुमित गाढवे, शरद आहेर, दिनेश शेळके, शिवनाथ औताडे, नितीन बुरके,सतिष तनपुरे, संदिप शिंदे, संजय भोर, ज्ञानेश्वर गागरे, संजय बेंद्रे, सुरेश ढोले, सचिन इरोळ, आकाश उदागे, अभय हासे, रोहित जाधव, संदीप जाधव, संतोष गागरे, राजू रोकडे, नंदू साळवे, अर्जुन रोकडे, बाळासाहेब वाळुंज, महेंद्र पांढरकर, पांडुरंग पडवळ, किरण खाडे, मंजाबापु वाडेकर, काशिनाथ गोळे, गोरख वाळुंज, विष्णू वाळुंज, दादा रोकडे, दादा शिंदे, संदिप व्यवहारे, नितीन गुंड, संपत तोरकड, यांच्यासह सर्वच पदाधिकारी वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.