गोवाहटी – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूर आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पूराचा फटका 25 जिल्ह्यांना बसला असून पुरामुळे तब्बल 14 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
दरम्यान आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करावी असे आवाहन सुवर्णकन्या हिमा दासनं केलं आहे. तिनं तिच्या पगाराची निम्मी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे. तसेच तिनं अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. ”आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर आहे. 33पैकी 30 जिल्हे पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मी सर्व कॉर्पोरेट्स आणि सर्वांना विनंती करते की या कठीण समयी आसामला मदत करा,” अशी फेसबुक पोस्ट हिमाने लिहिली आहे.
Flood situation in our state Assam is very critical, 30 out of 33 districts are currently affected. So i would like to request big corporates and individuals to kindly come forward and help our state in this difficult situation. pic.twitter.com/cbVZv7b4IP
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019
दरम्यान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशामध्ये मेघगर्जनेसह आणि वीजांच्या कडकडासह पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणीही पावसाचा जोर कायम आहे.