हिमाचल प्रदेश – हिमाचलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर १० जणांना वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान 17 व्या बटालियन इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची टीम शोध आणि बचाव कार्य करत आहे.
राजेंद्र पाठक, अशोक भालेराव व दीपक राव अशी मृत पावलेल्या ट्रेकर्सची नावे आहेत. 13 जणांच्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये 12 जण हे महाराष्ट्र राज्यातील आहेत. दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या ग्रूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला होता.
या 13 जणांच्या ट्रेकर्सनी 17 ऑक्टोबरला रोहरू ते विलेज-बुरुआ, तेह-सांगला, जिल्हा-किन्नौरपर्यंत ट्रेकिंगला सुरुवात केली. बुरुआ कांडा वरच्या भागात बर्फ पडल्यामुळे हे सर्व ट्रेकर्स तिथे अडकले.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ३ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 10 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. जवळपास 15 हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी आयटीबीपीची टीम आज घटनास्थळी पोहोचत आहे.