पुणे – कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय स्थितीचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. पण, पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. गुजरातजवळील समुद्रात निर्माण झालेली चक्रीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्याच्या किनारपट्टी भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या स्थितीचा प्रभाव कमी झाल्याने हा जोर ओसरला आहे. शहरातही शुक्रवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली.