घाटघरला अतिवृष्टी, भंडारदरात अर्धा टीएमसीची विक्रमी आवक
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार वृष्टी होत आहे. तर इतर भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. घाटघर गावाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रतनवाडी, पांजरे, भंडारदरा येथे सहा इंच, वाकी येथे साडेतीन इंच पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे भंडारदरा धरणातील आवकही या हंगामात विक्रमी ठरली असून भंडारदरा धरणात गेल्या 24 तासात 519 दशलक्ष सव्वा आठ टीएमसी झाले असून आठ दिवसाच्या हे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यामध्ये सध्या धरणांच्या पाणलोटात पावसाचे थैमान सुरू आहे. हरिश्चंद्र गड, पाचनई, घाटघर, रतनवाडी या भागामध्ये पावसाची उसंत नाही. घाटघर येथे अतिवृष्टी झाल्याने या भागातील आणि अन्य भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारदरा धरणामध्ये लक्षणीय पाणीसाठा झाला असून आज सकाळी सहा वाजता धरणांमध्ये आठ हजार 236 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. तो 74.61 टक्के आहे.तर निळवंडे धरणामध्ये 105 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे या धरणाचा पाणीसाठा पाच टीएमसी अधिक झाला.
आज सकाळी सहा वाजता या धरणामध्ये पाच हजार 14 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. तो 60.26 टक्के इतका राहिला. आढळा धरणामध्ये दहा दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. आज सकाळी सहा वाजता या धरणांमध्ये 542 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. तो 51.13 टक्के आहे. भोजापूर धरणामध्ये 18 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. या धरणात सकाळी 206 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. तो 57.06 टक्के होता. जायकवाडी धरणामध्येही चांगला पाणीसाठा होत असून आज सकाळी सहा वाजता तो 70.21 टीएमसी झाला होता. तो 73.52 टक्के इतका राहिला. गेल्या चोवीस तासांमध्ये झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये)- घाटघर – 165, रतनवाडी-155, पांजरे-145, वाकी-90, भंडारदरा-140,