पुणे – कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याची रोपे वाहून गेल्याने हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी होतात, असा अनुभव आहे. साठवणूक केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्रीस पाठला जातो. त्यामुळे दरात घसरण होते.
निर्यातबंदी जाहीर झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी लगेचच बाजारात माल विक्रीस पाठवितात. हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे, असे निरीक्षन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.