मुंबई – मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आज पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाचा जोर कायम राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झाला आहे.
पाऊस गायब झाल्यामुळे काही दिवस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तापमानातही वाढ झाली होती. गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी काही ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे रात्रीच्यावेळीही वातावरणात गारवा होता.
दरम्यान, हवामान खात्यानेही मुंबईसह, ठाणे, नाशिक आणि जुन्नर भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे.