पुणे जिल्हा – नांदुरमधील (ता. दौंड ) दहिटणे हा जुना पुल पाण्याखाली गेल्याने येणारी-जाणारी वाहतूत पुर्णपणे बंद झाली आहे. दौंड तालुक्यातील पश्चिम पट्यातील मिरवडी, दहिटणे, नांदुर, खामगाव ही गावे नदीलगत असल्याने या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान झाले. तसेच जनावरांच्या चारादेखील पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पूराच्या पाण्यात वाढ होत नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाचे मात्र गावाकडे दुर्लक्ष आहे. धरणातून नदीत किती पाणी सोडले किंवा किती पाणी सोडणार याबाबतची माहितीदेखील गावातील नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.