भोर – तालुक्यातील हिर्डोशी, निगुडघर, वारवंड, वेळवंड- पसुरे या पश्चिम पट्ट्यात काल राञी झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असुन वरंधा घाट मार्गावरील वारवंड , शिरगांव, पर्हर तसेच पसुरे, साळुंगण येथे दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे भोर मार्गे महाडला जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
मार्गावरील कोसळलेल्या दरडींचा राडारोढा हाटवण्याचे काम भोर च्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडून युद्ध पातळीवर सुरु आहे. तरी पावसचा जोर कायम असल्याने आढथळा निर्माण होत असल्याचे चिञ आहे.
या अतिवृष्टीने या भागातील शेती व शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भात पिकांची लागवड झालेली भातखाचरे गाळाने भरुन गेली असुन लागवड झालेली भाताची पिके राढारोढ्यात गाडली गेली आहेत. खाचरांच्या ताली अतिवृष्टीत वाहून गेल्या असुन करोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी या अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटा मुळे पुरता खचुन गेला आहे.
हिर्डोशी खोर्यातील नांदगांव चर्हाटे वाडी येथील भातशेताच्या ताली ढासळल्या असून लागवड झालेले भाताचे पिक गाडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे गणेश चर्हाटे यांनी सांगितले.
तर धानवली, म्हसर, हिर्डोशी आणि रिंगरोड परिसरामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याच बरोबर आंबवडे भागात या अतिवृष्टीचा फटका बसला असून आंबवडे येथील पुल पाण्याखाली गेला असून या भागातील रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. तर करंजे येथील पुलावरुन ओढ्याच्या पुराचे पाणी वाहात असल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे.
धानवली गांव हे डोंगर दर्यात वसलेले असुन दरडी कोसळण्याची भिती असल्याने माळीण सारखी दुर्घटना घडण्यची शक्यता वर्तवली जात आसून धानवलि येथील कंकवाडीला जोडणारा पुल पाण्यच्या प्रवाहाने तुटला असून गांवचा संपर्क खुंटला असल्याचे श्रीपती धानवले यांनी सांगितले. याच बरोबर दापकेघर येथील प्राथमिक शाळाच पाण्या खाली गेली आहे.
अतिवृष्टीने शेति पिकांचे व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश भोर चे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसिलदार अजित पाटील यांनी गांवकामगार तलाठी व संबंधितांना दिले आहेत.
भोर तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद खालील प्रमाणे
निगुडघर – 249 मि.मी, आंबवडे 193 मि.मी., भोलावडे 115 मि.मी., संगमनेर 45 मि.मी., नसरापुर 32 मि.मी., किकवी 14 मि.मी., व वेळू येथे 29 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.