नीरा – पुरंदर तालुक्यातील पूर्वभाग नेहमीच आवर्षणग्रस्त राहिला आहे. गेल्या 10 दिवसांपासून या भागासह संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. रोजचा पडणाऱ्या पावसामुळे येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे येथील पिके खराब झाली आहेत; परंतु पावसामुळे परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पुरंदर तलुक्यातील पूर्व भागातील लोकांना पाऊस पडेपर्यंत म्हणजे 15 दिवसांपर्यंत टॅंकरन पाणी पुरवली जात होते. पूर्व भागातील राख, नावळी या परिसरात तर तब्बल 10 वर्षांनंतर जोरदार पाऊस पडला आहे. 2009 नंतर आता यावर्षी या भागातील ओढे-नाले भरले आहेत. असे असले तरी या भागातील शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू पाहायला मिळत आहे. पावसाने तलाव व धरणे 10 वर्षांनंतर भरली आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे, पण या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
राख, नावळी हा परिसर कायमच दुष्काळाच्या छायेत राहिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी 15 किमीवरून नीरा नदीवरून पाणी आणून शेती फुलवली आहे. येथे कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आता डाळिंबाच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे या बागांचे मोठे नुकसान होणार हे निश्चित आहे. डाळिंबाबरोबरच ज्वारी, कांदा, हरभरा(पान 3 वर)
पुरंदरमध्ये मध्यंतरी झालेल्या पावसाच्या वेळी प्रशासन निवडणुकीच्या कामात मग्न होते. तरी देखील सतत पडणाऱ्या पावसाकडे आमचे लक्ष आहे. नुकसानीचा आढावा आम्ही घेत आहोत. तसा प्रकारच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. लवकरच नुकसानीचा आकडा समोर येईल.
-रुपाली सरनोबत, तहसीलदार पुरंदर