मुंबई – गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. अजून पढचे काही दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या
जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Possibility of thunderstorms⛈️ over Konkan and parts of interior Maharashtra to continue for next 2-3 days with reduction thereafter. Conditions becoming favorable for withdrawal of monsoon from northern parts of Maharashtra during next 3-4 days. District wise warnings ⬇️ pic.twitter.com/cvcorxjWHi
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 21, 2020
दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे ज्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.