मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सर्वाना सोसाव्या लागत आहेत. त्यात आजही अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2 मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याआधी हवामान खात्याच्या माहितीनुसार, काल महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णता होती. यावेळी कमाल तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला जात आहे.
📢Some Relief :
From 1st May,temperatures are very likely to start falling a little in Northern India, the current heat wave regions in coming 2,3 days as per the model guidance from @ncmrwfmoes and IMD.
Watch for updates please. pic.twitter.com/b5l6YPcofe— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 30, 2022
शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात हलके ढग असतील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 110 वर नोंदवला गेला. पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 120 वर नोंदवला गेला.
नागपुरात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 93 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 68 आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 106 आहे. तरीही नागरिकांनी या उष्णेतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आले.