नागपूर – विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आलू असून चंद्रपूरमध्ये आज 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असतानाच नागपुरातही या मोसमात पहिल्यांदाच 45 अंशाच्या वर तापमान गेले आहे. नागपुरात आज 45.2 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालीये.
राज्यात उन्हाचा कहर सुरुच आहे. येत्या 4 दिवसांत विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे.
2 मे पर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान उच्चांकी 45.9 अंशांवर पोहचले आहे. उष्ण वाऱ्यांमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे 12 ते 4 दरम्यान बाहेर येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.