मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. यानंतर शिवसेनेने न्यायालयात दाद मागत आमदारांवर अपात्रतेची मागणी केली होती. मात्र यानंतर सर्वोच्च न्ययालयात तारिक पे तारिकचा सिलसिला सुरु झाला. परंतु आज (ता.७) सर्वोच्च न्ययालयात याबाबतची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षातील फुटी संदर्भातील विषयावर नाययनिवाडा होण्यासाठी ५ सदस्य असलेल्या घटनापीठाची निर्मिती करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांनीच यासाठी पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन केले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. नरसिंहा यांचा या घटनापीठात समावेश करण्यात आला आहे.
सत्तासंघर्षांसाठी सुरु झालेले हे प्रकरण किचकट असल्यामुळे ५ सदस्य समितीपुढे सखोलपणे न्यायनिवाडा करण्यात येणार आहे. यावेळी आमदारांवरील अपात्रतेची कारवाई,नरहरी झिरवळ यांच्या निर्णयाची मान्यता अशा अनेक गोष्टीवर सुनावणी होणार आहे. यानंतर शिवसेना पक्ष तसेच पक्षचिन्ह नेमके कोणाचे अशा विविध गोष्टी स्पष्ट होणार आहेत.