नवी दिल्ली – २०१९ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीचा जागेशी संबंधित असलेल्या वादावरील सुनावणीचा निर्णय दिला आहे. मध्यस्थ कमिटीने बंद पाकिटातून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला असून, कमिटीने 15 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली आहे. कमिटीच्या या मागणीला कोर्टाकडून तात्काळ मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणाचा हा निकाल आणखी लांबणीवर नेण्यात आला आहे.
सरन्यायाधीश (सीजेआय) रंजन गोगोई, न्या.एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय.चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या.एस.अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी झाली आहे. यासाठी कोर्टाने ३ सदस्यीय पॅनेलचीही स्थापना असून, या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश आहे.
Ayodhya matter: Three-members Mediation panel seeks extension of time to find an amicable solution. Supreme Court grants time till August 15. CJI also says, "we're not going to tell you what progress has been made, that’s confidential" pic.twitter.com/XRLTS0lorc
— ANI (@ANI) May 10, 2019