मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे मुंबई क्रिकेट संघटनेत तसेच मुंबईतील एकूणच क्रिकेटवर वाढत चाललेले महत्व कमी करण्यासाठीच हे घडत असावे. सचिनच्या मुलाची अर्जुनची संघात निवड केली जाते परंतू एकाही सामन्यात खेळवले जात नाही. त्यामुळेच अखेर निऱाश झालेल्या अर्जुनने मुंबई सोडून गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र, .याबाबत अधिक काहीही सांगू शकत नाही, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेतील सुत्रांनी दिली आहे.
ज्या सचिनने मुंबई क्रिकेटलाच नव्हे किंवा भारतीय क्रिकेटलाच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये अफलातून योगदान दिले त्याच्याच मुलाच्या बाबतीत हे घडत असल्याने सध्या सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटत आहेत.
अर्जुन एक चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याला मुंबई संघटनेने आपल्या रणजी संघातही निवडले होते मात्र, त्याला एकाही लढतीत खेळवले गेले नाही. इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेतही त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात खरेदी केली परंतू त्याला या स्पर्धेतही राखिव म्हणूनच ठेवले गेले, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळेच सचिनने आपल्या मुलाला मुंबई व्यतरीक्त अन्य राज्याकडून खेळवण्याचा विचार केला व तसे गोवा राज्य क्रिकेट संघटनेशीही संवाद साधला.
त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देतानाच अर्जुनने मुंबई संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर अर्जुन येत्या मोसमात गोवा संघाकडून रणजी करंडक तसेच देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. अर्जुनने गेल्या वर्षी मुंबईसाठी आपला पहिला टी-20 सामना खेळत थाटात पदार्पण केले.
दडपण टाकणे अयोग्य – सचिन
अर्जुन माझा मुलगा आहे त्यामुळे त्याने माझ्यासारखेच खेळले पाहीजे असे चाहते अपेक्षा ठेवतात. ते योग्य नाही. त्याने त्याचा नैसर्गिक खेळ करावा व त्यासाठी मी देखिल त्याचा सामना पाहण्यासाठी जात नाही. कारण आपले वडील सामना पाहात आहेत असे म्हचल्यावर त्याच्यावर दडपण येइल व त्यामुळे त्याचेच नुकसान होइल, असे स्पष्टीकरण सचिन तेंडुलकरने दिले आहे. ज्यावेळी आई-वडील आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी जातात, त्यावेळी मुलांवरचे दडपण वाढते. त्यामुळेच त्याने कोणतेही दडपण न घेता खेळावे असे मला वाटते, असे सचिनने सांगितले आहे. मात्र, संघटनेतील कोणत्याही गोष्टींवर त्याने प्रतिक्रीया दिली नाही.