मुंबई – भारतीय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे माजी कर्णधार विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेतल्याने क्रिकेट विश्वात उलट -सुलट चर्चा सुरु आहेत.
त्याच्या जागी रोहित शर्माची एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-20 चे कर्णधारपद सोडले होते. आता विराट कोहलीकडे केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. दरम्यान रोहित शर्माच्या निवडीवर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शास्त्री म्हणाले, ”निकालांच्या आधारे त्रुटी शोधणे सोपे आहे, परंतु या भारतीय स्टारने आपल्या कार्यकाळात जे काही साध्य केले आहे, ती अभिमानाची गोष्ट आहे.”
तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे, त्याने जे काही संघासाठी केले आहे, ते न विसरण्यासारखे आहे. भारतीय संघाचा कर्णधार होणे सोपे नाही. त्याने जे काही मिळवले, त्याचा त्याला अभिमान वाटला पाहिजे. मला आठवते की सनीने (सुनील गावसकर) त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडून दिले.
सचिन तेंडुलकरनेही हेच काम केले. विराट कोहली कसोटी क्रिकेटच्या बाबतीत किती समर्पित आहे, हे आपण सर्व जाणतो. संघाला यशस्वी करण्यासाठी तो आपले सर्वस्व देतो.” विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे संबंध फार चांगले होते.
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कोहलींमुळेच रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि दोन्ही खेळाडू एकमेकांचे खूप कौतुक करतात. मात्र, रवी शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता विराट कोहलीही केवळ एकाच फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिला आहे.