नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून आत्महत्या आणि हत्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील विजयनगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येचं गुढं अखेर उघड केलं आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आई-वडीलांसह बहिणी आणि आजीची हत्या हडवून आणल्याचं समोर आलं आहे.
आरोपीने हे कृत्य करण्यामागचं कारण पोलिसांनी उघड केला आहे. आरोपी अभिषेक उर्फ मोनू मलिन याने हत्येमागे मालमत्तेचा वाद आणि घरगुती भांडण असल्याचं सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण कुटुंबाची संपत्ती ही मुलीच्या नावे होती. यामुळे मोनू नाराज होता.
या नाराजीतून मोनू याने संपूर्ण कुटुंबाचीच हत्या घडवून आणली. या प्रकरणात पोलिसांनी चार दिवस संशयितांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्य आरोपाला ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा कबूल केला.
गेल्या शुक्रवारी दुपारी प्रदीप मलिक यांच्या घरात घुसून प्रदीप, त्यांची पत्नी, मुलगी नेहा आणि सासू यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात प्रदीप, त्यांची पत्नी आणि सासू जागीच ठार झाले होते. तर मुलगी नेहा हिने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आरोपी मोनू हा मृत कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे.