नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस जातीय राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
नरोत्तम मिश्रा म्हणाले कि, दंगलखोरांना कॉंग्रेसचा हात आहे. त्यांना दलितांची कोणतीही चिंता नाही. तर केवळ पक्षाच्या हिताची चिंता आहे. जेव्हा कोणत्याही जातीची गोष्ट येते तेव्हा ते पुढे येतात. परंतु, त्याचवेळी हिंदुत्वाबद्दल बोलत असल्यास जातीयवाद म्हणून ओरडतात. देशाने जातीमध्येच विभागून राहावे, असे त्यांना वाटते. हाथरस हा संयोग नसून एक प्रयोग असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
कांग्रेस का हाथ दंगाइयों के साथ। इनको दलित की चिंता नहीं दल हित की चिंता है…जब भी किसी जाति की बात आती है तो आगे आ जाते है और हिंदुत्व की बात करे तो सांप्रदायिक-सांप्रदायिक चिल्लाने लगते हैं। वो चाहते हैं जातियों में देश बंटे। हाथरस एक संयोग नहीं एक प्रयोग था: म.प्र. गृहमंत्री pic.twitter.com/Uud17QBnhK
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2020
दरम्यान, हाथरस येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत मृत मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली होती. या कृत्याचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. मात्र, यानंतर कॉंग्रेसचे नेते राहूल आणि प्रियांका गांधी यांनी पीडीतेच्या कुटुंबियांची अखेर भेट घेतलीच.