मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरली आहे. कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं होत. या सर्व घडामोडींनंतर अभिनेत्री कंगना बऱ्याच दिवसांनी काल पुन्हा एकदा मुंबईत आली.
यावेळी कंगनाने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ती म्हणाली की, “मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही”. असं कंगना म्हणाली.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra 🙏 pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
दरम्यान, कंगनच्या या व्यक्त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ.., असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले.
“for standing up for my beloved city Mumbai “ 🤔🤔🤔
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…😂😂😂— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
कंगना गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबात सुट्टी घालवत होती. नुकतीच कंगना रणावत मुंबईत दाखल झाली. यावेळी तिच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था होती. ठाकरे सरकारसोबत झालेल्या वादानंतर कंगनाला देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा अद्यापही ठेवण्यात आली आहे.