नवी दिल्ली – कॉंग्रसचे राजस्थानातील उदयपूर येथे तीन दिवसांचे िंचंतन शिबीर सुरू झाले आहे. अनेक दिग्गज नेत्यांना त्याचे निमंत्रण न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.
मात्र कॉंग्रेसचेच गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांना निमंत्रण मिळूनही त्यांनी शिबिराकडे पाठ फिरवल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक यांनी याद्वारे हायकमांडला स्पष्ट संदेश पोहोचवला असल्याचे मानले जाते आहे. पक्षाच्या नेत्यांनी एकजुट दाखवावी आणि पक्षातील व्यासपीठावरच आपली भूमिका मांडावी असा संदेश आजच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला. मात्र हार्दिक यांची नाराजी बऱ्याच दिवसांपासून आहे.
आपल्याला कार्याध्यक्ष तर बनवण्यात आले. मा जुने नेते आपल्याला कामच करू देत नाहीत, अशी व्यथा त्यांनी अगोदरच मांडली आहे. हार्दिक यांच्याशी खुद्द राहुल गांधी यांनी चर्चा केल्यावर विषय संपला होता. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही थंडावल्या होत्या. मात्र हार्दिक यांच्या आजच्या कृतीने ते अंदाज खोटे ठरवले आहेत.