हार्दिक पटेल यांना करण्यात आलेल्या अटकेबद्दल कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार आगपाखड केली आहे. भाजप सरकार हार्दिक पटेल यांची वारंवार छळवणूक करीत आहे असा आरोप त्यांनी ट्विटरवर केला. हार्दिक पटेल हे युवकांसाठी व शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी ते आंदोलन करीत आहेत. त्याला विरोध करण्यासाठीच त्यांचा भाजपने छळ चालवला आहे असा आरोप त्यांनी केला. सामान्यांसाठी आवाज उठवणे हा भाजपसाठी देशद्रोह असतो अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.