मुंबई – आयपीएल स्पर्धेतील कामगिरी सरस असून आता हार्दिक पंड्याने आगामी काळात केवळ टी-20 सामन्यांवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. यामुळे पंड्याने त्या स्पर्धेसाठी एकदिवसीय सामन्यांतून ब्रेक घ्यावा, असेही शास्त्री म्हणाले.
पंड्याने आयपीएल स्पर्धेत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. तो आता फलंदाजीसह गोलंदाजीही करत आहे. आता त्याने केवळ टी-20 विश्वकरंडक जास्त महत्त्वाचा मानत पंड्याने पुढील काही काळ एकदिवसीय सामने खेळणे थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.