नवी दिल्ली – भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर उघड टीका केली आहे. शास्त्री हे बोलघेवडे आहेत, पराभवानंतर वाट्टेल ते मत व्यक्त करून संभ्रम निर्माण करतात असे सांगताना हरभजनने अंतिम संघ निवडीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेतील पराभवानंतर शास्त्रींनी केलेल्या दाव्याला काहीही अर्थ नाही. ते मुख्य प्रशिक्षक असताना फलंदाजांना साधी जबाबदारीचीही जाणीव देखील त्यांना करून देता आली नाही, मग पराभवाची कारणे सांगणे याला काही अर्थच राहत नाही. मुख्य प्रशिक्षकच नव्हे तर संघातील खेळाडू सारवासारव करण्यात तरबेज आहेत, असेही हरभजनने सांगितले.