नवी दिल्ली – पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या करोनाग्रस्तांसाठीच्या कार्याचे कौतुक केल्याने टीकेचा धनी बनलेल्या भारताच्या हरभजनसिंगने करोनाग्रस्त 5 हजार कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले आहे. देशात लॉकडाऊन असल्याने समाजातील गरीब व गरजू लोकांना तसेच करोनाग्रस्तांच्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांची जबाबदारी हरभजनने उचलली आहे. या कुटुंबांना हरभजन अन्नधान्य व किराणा सामान देत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत किराणा सामान विक्रीची दुकानेही समाविष्ट असली तरीही त्यांच्याकडे उपलब्ध साहित्य सर्वांनाच मिळेल अशी शाश्वती नाही. अन्नधान्याचा पुरवठा जेव्हा सुरळीत सुरू होईल तोपर्यंत हरभजन रोज अशा गरजूंना आपल्यातर्फे याचे वाटप करत आहे.