बारातमी (प्रतिनिधी) : जरी मी होळीच्या शुभेच्छा देत असलो तरी होळी सण साधे पणाने साजरी करावी व सार्वजनिक होळी कुणीही साजरा करू नये असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोरोनाचे मोठं संकट देशावर राज्यावर आहे, यामुळे कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत. मास्क वापरावेत, सामाजिक अंतर ठेवले पाहिजे असं सांगून प्रतिसाद मिळत नसेल तर सरकारला कठोर पाऊले उचलावी लागतील.
पहिल्या लाटे मध्ये जेवढी संख्या सापडली होती त्यापेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परिवारच्या परिवार कोरोनाने वेढलेला दिसतोय ही चिंतेची बाब आहे. म्हणून यंदाचा होळी सण साधे पणाने साजरा करावा व सार्वजनिक होळी कुणीही साजरी करू नये, असं आवाहन त्यांनी जनतेला केले.