चित्रपटसृष्टीत नायक-नायिका अथवा निर्माता-दिग्दर्शक- नायिका अशा जोड्या ढिगाने आहेत. जेव्हापासून हा उद्योग भरभराटीला आला तेव्हापासून या जोड्या आहेत. त्यांनी लग्नही केले. काहींचे संसार सुखाचे झाले, काहींचे अर्ध्यावरती मोडले.
संसार मोडायला विशेष असे कारण लागत नाही. मात्र, आकडेवारी बघायची झाली तर इंडस्ट्रीतल्याच व्यक्तीशी लग्न केल्यावर अनेक नायिकांचा संसार तेवढा सुखाचा झाला नाही. त्याला अपवाद आहेत.
ते औषधाइतके. असो. मात्र, ज्यांनी बाहेरच्या व्यक्तीशी लग्न केले त्यांचा संसार सुखाचा झाला. त्याची ठळक उदाहरणे द्यायची झाली तर माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांचे देता. येते मिनाक्षी शेषाद्रीचेही नाव देता येते.
मात्र, तिच्या पतीबद्दल फार ऐकिवात नाही. मात्र, या दोघींचे नवरे चांगल्या अर्थाने चर्चेत असतात. जुहीचा नवरा उद्योगपती आहे. माधुरीचा एक प्रथितयश डॉक्टर. त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे.
अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना माधुरी म्हणाली की, तिने शाहरूख, आमीर आणि सलमान या तिघांसोबत काम केले. हे तेव्हाही टॉपचे स्टार होते. मात्र, त्यांच्याशी लग्न करावेसे तिला वाटले. तिने क्षेत्राबाहेरच्या व्यक्तीची निवड केली. मला वाटत होते की माझे पतीच माझ्यासाठी हिरो असावेत. त्यामुळेच तिने डॉक्टरशी अरेंज मॅरेज केले.
जुहीनेही साधारण असेच मत नोंदवले. तिचा पती तिला लग्नाअगोदर नियमित तिला भेटवस्तू द्यायचा. अर्थात हे काही लग्न करण्याचे कारण नाही. मात्र, तो इंडस्ट्रीतल्या स्टारसारखा नव्हता.
आपण लग्न करू तेव्हा आपला पार्टनर आपल्यासारखाच हवा अशी आपली इच्छा होती. तिची इच्छा कुठेतरी जय मेहताजवळ पूर्ण झाली आणि तिने संसार थाटला.