देशात कृषिक्रांती, धवलक्रांती साकारणाऱ्या मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा यंदा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा कररताना बारामतीकर खऱ्या अर्थाने आनंदीत आहेत. साहेबांनी विद्यार्थीदशेपासून सुरूवात करीत मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री पदासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना, बीसीसीआय अध्यक्ष तसेच राष्ट्रीय पातळीवरील अतिमहत्त्वाच्या पदांना गवसणी घातली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख न संपणारा असाच आहे.
त्यांच्याच कर्तृत्वामुळे बारामतीकरांसह अनेकांच्या जगण्याला अर्थ आला. यामध्ये शेतकऱ्यांसह समाजातील अनेक घटकांसाठी साहेबांनी घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहे. आदरणीय साहेबांच्या दिग्गज महाकाय अशा कारकिर्दीला आम्हा बारामतीकरांचा सलाम…
… शिवसृष्टीमुळे ऐतिहासिक वैभवात भर पडणार
कण्हेरी गावालगत नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाजवळ ७०० मीटरवर शिवसृष्टीचा प्रकल्प सादर होणार आहे. सिंधूदुर्ग किल्ल्याच्या वाचा आलेख धर्तीवर किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. ती पाहण्यासाठी बोटीतून पर्यटकांना जावे लागेल. यानंतर सिंहगडाची प्रतिकृती साकारली जाणार असून ३ शक्तीपिठांची प्रतिकृती शिवसृष्टीत असणार आहे. शिवसृष्टीभवती तटबंदी व बुरूजाची रचना केली जाणार आहे. त्यावरून पर्यटकांना पूर्णपणे चालत जाता येईल. तसेच पावन खिंडीची लढाई थ्रीडी इफ्टेक्टमध्ये दाखविली जाणार आहे. तसेच रायगडावरील राजसदरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
२०२२ मध्ये साकारणारे नियोजित प्रकल्प
ब्रुहत पाणीपुरवठा योजना, नवीन कलादालन नाट्यसंकुल निर्मिती, पोलीस कर्मचारी वसाहत, पोलीस उपमुख्यालय अतिरिक्त पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाणे इमारत, नवीन सुसज्ज बसस्थानक, नागरिकांना पाईपद्वारे गॅसपुरवठा, श्रीमंत बाबुजी नाईकवाडा सुशोभिकरण, रेल्वे रूळाखाली अंडरपास निर्मिती, वसंतराव पवार नाट्यगृहाच्या जागेवर नवीन नाट्य संकुल व शॉपींग कॉम्प्लेक्स आदी प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत विविध महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानंतर बारामतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. बदललेली बारामती पुढील सात पिढ्यांचे भवितव्य बदलणार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या प्रकल्पांमुळे शहराची राज्यातील दळणवळणाचे महत्वाचे शहर आणि राज्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. यामध्ये काहींचे काम सुरु झाले आहे, तर काही प्रकल्प प्रस्तावित आहेत.
यामध्ये का नदी सुशोभिकरण, शिवसृष्टी, निराडावा कालवा, सुशोभिकरण, बटरफ्लाय वनउद्यान, एसटी बसस्थानक, आयुर्वेदिक महाविद्यालय, जुनी मंडई शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेंट्रल लायब्ररी, थीम पार्क, सीसीटीव्ही बसविणे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामृहासह बाह्यवळण रस्त्यांचा समावेश आहे. यानंतर बारामती पाश्चात्य देशांच्या धर्तीवर सुंदर शहर म्हणून नावारुपास येणार आहे.
कण्हेरी नजिक वनविभागाच्या ६० हेक्टर जागेमध्ये हे नितांत सुंदर वनउद्यान आकारास येणार आहे. या क्षेत्रात चिंकाराचा नैसर्गिक अधिवास आहे. भविष्यातील आकर्षण असलेल्या शिवसृष्टीच्या नजिक हे उद्यान होणार आहे. या ठिकाणी फुलपाखरांचा मोठा अधिवास असल्याने येथे बटरफ्लाय गार्डन होणार आहे. शहरातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याच्या सौंदर्यात भर घालणारे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या साठवण तलावातील निघालेला मुरूम वापरून कालव्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. यासाठी कोणताही स्वतंत्र निधी देण्यात आलेला नाही. जलसंपदा विभागाची यंत्रणा वापरून केवळ इंधनाच्या खर्चातून काम करण्यात आले आहे. राज्य शासनाने हायब्रीड ॲन्युईटी प्रकल्पाअंतर्गत जेजुरी-मोरगाव-बारामती-कळंब-बावडा- नीरा नरसिंगपूर असा ८६ कि.मी. लांबीचा रस्ता नव्याने करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पातील जेजुरी ते मोरगाव हा टप्पा पूर्ण झाला आहे. आता मोरगाव ते बारामती रस्त्याचे काम सुरु आहे. यावरील वाहतूक लवकरच प्रत्यक्षपणे सुरु होणार शिवसृष्टीमुळे बारामतीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार आहे. कण्हेरी गावालगत नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाजवळ ७०० मीटरवर शिवसृष्टीचा प्रकल्प सादर होणार आहे. सिंधूदुर्ग किल्ल्याच्या धर्तीवर किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. ती पाहण्यासाठी बोटीतून पर्यटकांना जावे लागेल. यानंतर सिंहगडाची प्रतिकृती साकारली जाणार असून ३ शक्तीपिठांची प्रतिकृती शिवसृष्टीत असणार आहे.
शिवसृष्टीभवती तटबंदी व बुरूजाची रचना केली जाणार आहे. त्यावरून पर्यटकांना पूर्णपणे चालत जाता येईल. तसेच पावन खिंडीची लढाई थ्रीडी इफ्टेक्टमध्ये दाखविली जाणार आहे. तसेच रायगडावरील राजसदरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. २०२१ मध्ये साकारले जाणारे बृहत पाणीपुरवठा योजना, नवीन कलादालन नाट्यसंकुल निर्मिती, पोलीस कर्मचारी वसाहत, पोलीस उपमुख्यालय अतिरिक्त पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाणे इमारत, नवीन सुसज्ज बसस्थानक, नागरिकांना पाईपद्वारे गॅसपुरवठा, श्रीमंत बाबुजी नाईकवाडा सुशोभिकरण, रेल्वे रूळाखाली अंडरपास निर्मिती,
वसंतराव पवार नाट्यगृहाच्या जागेवर नवीन नाट्य संकुल व शॉपींग कॉम्प्लेक्स आदी प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी आहेत. यामध्ये पोलीस उपमुख्यालयासाठी ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बारामतीच्या याच पोलीस उपमुख्यालयातून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. तसेच शहरात पोलिसांसाठी लवकरच सुंदर रचना असणारी पोलीस वसाहत उभारली जाणार आहे. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने असणार आहेत.
संपूर्ण बारामती शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच शहरात येणाऱ्या महत्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर पूर्ण शहर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे बारामती अधिक सुरक्षित शहर बनणार आहे. इमारतींवर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय नगरपालिकेच्या पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल कमी व्हावे या उद्देशाने बारामती शहरातील साठवण तलावांसह नगरपालिकांच्या विविध इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्याचा प्रस्ताव आता शासनास सादर केला जाणार आहे. शहरातील सहा इमारतींवर सौर उर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून दररोज सहा मेगेवॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव नगरपालिकेने अगोदरच पाठवलेला आहे.
शहरातील महत्त्वाचा समजला जाणारा तीन हत्ती चौक कात टाकणार आहे. तीन हत्ती चौकाचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. येथे सीटी सेंटर टाऊन हॉलची संकल्पना प्रत्यक्ष येणार आहे. पुलाची रूंदी वाढवून सुशोभिकरण करून रस्ता वळवून अत्यंत १. सुंदर असा चौक येथे अस्तित्वात येणार आहे. जुनी भाजी मंडईतील संपुर्ण व्यापारी संकुलाच्या जागेवर आधुनिक शॉपिंग कॉम्लेक्स उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयापाठोपाठ शहरालगतच्या मेडद त परीसरात आयुर्वेदीक महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. बारामती ‘मेडीकल हब’ होण्याच्या दृष्टीने हे ल महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
तसेच शहरात ‘सेंट्रल ठेलायब्ररी’ देखील उभारण्यात येणार आहे. त्यानंतर वाचनसंस्कृतीला अधिक बळ प्राप्त होईल. तांदुळवाडी येथे ५० हेक्टर जमीनीवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. बारामती शहराप्रमाणे आसपासच्या पाच किमी गावांमध्ये भूमिगत वीजपुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे आता बारामती आणि आसपासचा परिसर ‘वायरलेस’ सुरक्षित बनला आहे. विशेषत: पावसाळ्यात आसपासच्या गावांमध्ये वीज खंडीत होण्याचे प्रकार पूर्णपणे थांबणार आहेत.
शहरातील पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचे गणित ग्राह्य धरुन मा. अजितदादांनी पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. त्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. निरा डावा कालव्यावर आधारीत या योजना पूर्णत्वास आल्यानंतर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल, हे मी अभिमानाने नमूद करीत आहे. त्यानंतर बारामतीकरांच्या मुलभूत गरजा ख-या अर्थाने पूर्ण होतील, यात शंका नाही. एकुण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामती देशातील आधुनिक, परिपूर्ण शहराच्या दिशेने वाटचाल पूर्ण होणार आहे. अजितदादांच्या संकल्पनेतील बारामती आम्हा बारामतीकरांसाठी भूषणावह अशीच असणार आहे.
(आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी बारामती नगरपरिषद)