नगर – गणपती,दसरा,दिवाळी हे सणउत्सव पार पडल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर बुधवार,दि.13 पासून धडक कारवाई सुरु केली आहे.ही कारवाई तीन टप्प्यात सलग 20 ते 25 दिवस चालणार असून एकदा अतिक्रमण काढल्यावर पुन्हा अतिक्रमण केले तर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करणार आहे,अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.मात्र,अतिक्रमण विरोधी पथक पुढे जाताच जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर पुन्हा हातगाड्या लावण्यात आल्याने या अतिक्रमण धारकांनी महापालिका प्रशासनालाच आव्हान दिले आहे.
शहरातील जुन्या बसस्थानक चौकापासून बुधवारी सकाळी सकाळी 10 वाजता या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.इथापे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी जितेंद्र सारसर,अंबादास सोनवणे,अशोक साबळे,नाना गोसावी,अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख,अर्जुन जाधव यांच्यासह 40 कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोहिमेस सुरवात केली.
छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून जिल्हा परिषद समोरील रस्ता ते माळीवाडा वेस तेथून वाडियापार्क,हिराबाई भापकर पुतळा,पुन्हा माळीवाडा तेथून पंचपीर चावडी,आशा टॉकीज चौक या परिसरातील विविध प्रकारची अतिक्रमणे पथकाने काढून टाकली.अनेक टपऱ्या जेसीबीच्या साह्याने उचलून त्या जप्त करण्यात आल्या.अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यासाठी दोन डंपरही या पथकासोबत होते.
दुपारपर्यंत दोन्ही डंपर भरून अतिक्रमणासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे अतिक्रमणाने गजबजलेले रस्ते अतिशय प्रशस्त दिसत होते.
दरम्यान,अतिक्रमण हटाव मोहिम मोठ्या दिमाखात सुरु झाल्यानंतर हातगाड्यावाल्यांनी आपल्या हातगाडया थोडा वेळ बाजूला नेवून लावल्या व पथक पुढे जाताच काही वेळातच या हातगाड्या थोडा वेळ बाजूला नेवून लावल्या व पथक पुढे जाताच काही वेळातच या हातगाड्या पुन्हा या ठिकाणी लावण्यात आल्याने या अतिक्रमण धारकांनी महापालिका प्रशासनालाच आव्हान दिल्याचे दिसून येते.
त्यामुळे आता महापालिका प्रशासन खरच कठोर कारवाई करणार का याबाबत उत्सुकता आहे.