पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 14.82 टीएमसी म्हणजे 50.83 टक्के इतका झाला आहे.
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या क्षेत्रात मागील 15 दिवसांपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पावसाचा जोर नसल्याने धरणसाठ्यात अल्प प्रमाणात वाढ होत आहे. सध्या 50 टक्के पाणीसाठा झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे ही धरणे कधी भरतात, याकडे लक्ष आहे. बुधवारी खडकवासला-0, पानशेत-6, वरसगाव- 4 टेमघर-3 मिमी पावसाची नोंद झाली.