हडपसर : केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला आहे. असा आरोप काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केला.
भारतीय लष्करात तरुणांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजना व गांधी परिवारावर केलेली ईडी कारवाईच्या विरोधात हडपसर मध्ये वेशीसमोर गांधी चौकामध्ये हडपसर कॉंग्रेसच्या वतीने सकाळी 11 वाजता हे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशांतमामा तुपे, विजय जाधव, उर्मिला आरु,दिलीप तुपे, नितीन आरु, अल्ताफ शेख, गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, इंदिरा तुपे, पुष्पा गायकवाड, खंडू लोंढे, दीपक गुप्ता, बाळासाहेब गोंधळे, राजू शिंदे, दत्ता डुरे, वैभव डांगमाळी,स्वप्नील डांगमाळी, निलेश ससाणे, अजित ससाणे, जान महंमद शेख, महेंद्र तिडके, जयपाल भागवत, सोमनाथ देडगे, संजय लोखंडे आदिंसह हडपसर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून अग्निपथ योजनेचा निषेध व्यक्त केला.
सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने सदर योजना मागे घ्यावी, अशी मागणी मामा तुपे यांनी आंदोलनादरम्यान केली .दरम्यान काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हडपसर येथील या आंदोलनाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी सवांद साधला.