पुणे – करोनाचे कारण पुढे करत सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडीला घाबरतंय म्हणून अधिवेशन घेतले जात नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर शुक्रवारी अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“निवडीला कोणीही घाबरत नाही. निवडीला घाबरलो असतोच तर विधानसभा अध्यक्षाचा राजीनामाच आम्ही घेऊ दिला नसता. मला आणि मुख्यमंत्र्यांनी भेटून व त्याच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून, महाविकास आघाडीत नेत्यांना भेटूनच नाना पटोले यांनी राजीनामा दिला. आज सरकार बहुमतात आहे.
सरकार पडेल म्हणत विरोधी पक्ष तीन-तीन महिने वाढवत आहे. सरकार स्थापन होऊन सव्वा वर्षे झाले आहे. सध्या तरी सरकारला कुठलाही धोका नाही,’ असेही अजितदादा यांनी म्हटले आहे.