डॉ. अभय टिळक
भाषा हे ज्ञानाच्या आदानप्रदानाचे गाभासाधन. भागवत धर्मीय संतांनी त्याचसाठी प्राकृतासारख्या देशी लोक भाषेला ज्ञानसंक्रमणाचे माध्यम बनविले. ज्ञानदेवी नामक आपली गीताटीका प्राकृतामध्ये सिद्ध करून “छपन्न भाषेचा केलासे गौरव’ असा ज्ञानदेवांचा जो महिमा नामदेवरायांनी सांगितलेला आहे, त्याचे रहस्य हेच.
जीवन जगण्याची कला आणि शास्त्र शिकविणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतारूपी ज्ञाननदीच्या प्रवाहामध्ये स्नान करण्यासाठी उत्सुक असणारे जनसामान्य तिच्या काठावर फोफावलेल्या संस्कृतभाषारूपी गहन वनांपायी त्या ज्ञानप्रवाहापासून वंचित राहत असत. त्यामुळे संस्कृताच्या त्या घनदाट वनांमधून गीतारूपी ज्ञानप्रवाहामध्ये उतरणे सुलभ व्हावे म्हणून मराठी भाषेच्या पायऱ्या श्रीनिवृत्तिनाथांच्या इच्छेनुसार मी निर्माण केल्या असे ज्ञानोबाराय सांगतात,
“तीरे संस्कृताची गहनें। तोडोनि मऐहाटिया केली शब्दसोपाने। रचिली धर्मनिधानें। निवृत्तिदेवें।।