अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणौनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ।। 417 ।। तो आधीं जरी दुराचारी । तरी सर्वोत्त- मुचि अवधारीं । जैसा बुडाला महापुरीं । न मरतु निघाला ।। 418 ।। तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ।। 419 ।। अध्याय 9 वा
एखादा अत्यंत दुराचारी जरी असला तरी, त्याने भगवंताची समर्पण भावाने भक्ती केली तर त्याचे पूर्वसंचित पाप नष्ट होऊन तो साधूच्या योग्यतेचा होतो, असे प्रतिपादन माऊली येथे करतात.
अंतकाळी वासना असेल त्याप्रमाणे पुढची गती किंवा पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून पश्चाताप झाल्यानंतर वयाच्या शेवटी ज्याने आपले आयुष्य भक्तीला समर्पित केले, तो पूर्वी जरी दुराचारी असला तरी भक्ती सामर्थ्याने सर्वोत्तमच होतो,
जसा महापुरात बुडालेला मनुष्य न मरता महापुरातून अलीकडच्या तीराला जिवंत आला, म्हणून त्याचे बुडालेपण जसे वाया गेले, त्याप्रमाणे दुराचारानंतर वयाच्या शेवटच्या अवस्थेत केलेल्या भक्तीमुळे पूर्वी केलेले पाप मुळीच उरत नाही आणि पाप करण्याची प्रवृत्तीही कायमची नष्ट होते.