मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री म्हणाले.
अर्थसंकल्पाचे आपण त्याचे स्वागत करतो. ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी, शाश्वत स्वच्छता, प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे पेयजल सुविधेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असल्याचा दावा त्यांनी केला.