मुंबई : राज्यात काही महिन्यापूर्वी मोठी बंडखोरी झाली होती. शिवसेनेतून मोठा गट बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. तेंव्हा पासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक टीका होताना दिसत आहे. त्यातच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गट लवकरच सामील होणार असल्याचे म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरयावेळी सडकून टीका केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरे यांना पाच आमदारांचा देखील पाठिंबा राहणार नसल्याचे मोठे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. एवढेच नाही तर मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचे ऐकतोय असेही पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मला कुत्र हे चिन्ह दिले तरी मी निवडून येईल असे सत्तार यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टिळक करत “चंपासिंग थाप हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं, ते चंपासिंग थापा देखील यांना सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचे एकतो आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना कात्रीत अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामध्ये प्रताप सरनाईक यांचा मुलागा पूर्वेश सरनाईक यांना स्थान देण्यात आलेले नाही. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. या कार्यकारिणीमध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर यांच्या मुलाची वर्णी लागली आहे.