पोरबंदर – ‘वायू’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचे अंदाज वर्तविले जात होते मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे ‘वायू’ चक्रीवादळाचा तडाखा थेट गुजरातला बसणार नसला तरीही समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे. समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत. मुंबईसह कोकण किनारपट्टीला वायू वादळाचं संकट टळलं असलं तरी त्याचा परिणाम मुंबईत जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
Gujarat: Six teams of National Disaster Response Force (NDRF) are on alert in Porbandar; #visuals of an NDRF team (of 30 members) standby at Chowpatty beach. As per latest update of IMD, #CycloneVayu won’t hit Gujarat, but will have effect on coastal districts pic.twitter.com/Ux1x3u1XNO
— ANI (@ANI) June 13, 2019