गृहमंत्र्यांना दिल्लीची परिस्थिती हाताळता आली नाही; तात्काळ राजीनामा द्या
मुंबई: गुजरात मॉडेलची पुनरावृत्ती दिल्लीत झाली आहे. गृहमंत्र्यांना दिल्लीची परिस्थिती हाताळता आली नाही की त्यांनी तसे निर्देश पोलिसांना दिले होते का याची चौकशी करण्यात यावी व त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
दिल्लीत दोन महिने निवडणूका होण्याअगोदर केंद्रातील नेते वातावरण बिघडवण्याचे काम करत होते. कपिल मिश्रा यांनी ट्रम्प गेल्यावर बघून घेवू असे धमकावले. दिल्लीत पोलिसांनी आपली ड्युटी बजावली नाही. राजकीय दबावाला पोलिस बळी पडली आहे. पोलिस खात्याने जबाबदारी पार पाडली नाही. ही सुनियोजित घटना होती असेही नवाब मलिक म्हणाले.
गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले होते अशी चर्चा आहे. भाजपचे मंत्री अनुराग ठाकुर, कपिल मिश्रा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अनुराग ठाकुर यांचा राजीनामा घेतला पाहिजे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.