नगर – कर्जत-जामखेड तालुक्यात अद्यापही अनेक गावात सिंगल फेज वीज नाही. ज्या गावांमध्ये वीज आहे. त्यागावातील पोल गंजले आहेत. तर त्यातील काही पावसामुळे पडले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हे कर्जत-जामखेडचे असतांना देखील त्यांच्या मतदार संघात अनेक नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. पालकमंत्री हे नावापूरतेच असून, त्यांनी जिल्ह्याच पालकत्व घेतले नाही.असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नगर येथील महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची भेट घेवून कर्जत-जामखेड तालुक्यातील वीज विषयक समस्यांचा पाढा पवार यांनी वाचला. यावेळी ते बोलत होते. कर्जत-जामखेड मतदारसंघात मंत्री आणि पालमंत्री असतांना देखील मतदारसंघाचा वीजेपासून रस्त्यापर्यंतचा विकास झाला नाही. ऐखाद्या मंत्र्याचे मतदारसंघ आहे असे वाटत नाही. त्यामुळे त्यांचे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले असल्याचे वाटत आहे. जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्यापही जनावरांना चारा उपलब्ध झाला नाही. प्रशासनाने छावण्या बंद केल्यास जनावरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चारा छावण्यांबाबत आढावा घेतला आहे.