नवी दिल्ली – जीएसटी लागू होण्याअगोदर भारतातील अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या केवळ 66 लाख 25 हजार इतकी होती. ही संख्या आता 1.28 कोटी इतकी झाली आहे. त्याचबरोबर कर संकलननही वेगात वाढत आहे. आगामी काळातही कर संकलन वाढेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
या कर प्रणालीला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कर अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात सीतारामन यांनी म्हटले आहे की, गेल्या आठ महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक लाख कोटी रुपयांचे कर संकलन होत आहे.
आगामी काळातही यापेक्षा जास्त कर संकलन होईल अशी आशा आहे. भारतासारखी मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये एवढी मोठी कर प्रणाली लागू करणे सोपे नसते. मात्र जनतेने आणि कर अधिकाऱ्यांनी अतिशय समजूतदार भूमिका घेतल्यामुळे ही करप्रणाली यशस्वी होत आहे.