नवी दिल्ली-कोरोना संकटामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे.
या वाढीबाबातची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. व्हीडिओ काॅन्फरसिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. पाच कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना कोणताही व्याज दर, उशीरा फी आणि जीएसटी उशिरा भरल्याबद्दल दंड आकारला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितले.
याचबरोबर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना जीएसटी भरण्यात उशीरा झाल्यास फी किंवा दंड आकारला जाणार नाही, तर नऊ टक्के व्याज देईल. रचना योजना निवडण्याची तारीखही 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.