निर्मला सीतारामन यांच्या उत्तरानंतर राज्यसभेतून विरोधकांचा सभात्याग
नवी दिल्ली : सध्या आर्थिक वाढ काहीशी मंदावली आहे, याचा अर्थ मंदी आली आहे, असा नाही. भारतात मंदी कधीही येणार नाही, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
तुम्ही जर अर्थव्यवस्थेचा बारकाईने अभ्यास केला, तर लक्षात येईल की, वाढ काहीशी कमी झाली आहे. पण अद्याप मंदी आलेली नाही. मंदी कधीच येणार नाही, असे सीतारामन म्हणाल्या. देशाच्या आर्थिक प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत त्या उत्तर देत होत्या.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उचललेल्या 32 उपायांना आता चांगली फळे मिळू लागली आहेत. त्या म्हणाल्या, सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर 6.4 टक्के होता. तो 2014 ते 19 या काळात तो 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या या उत्तरामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत देशाचा विकासदराने 25 वर्षातील निचांकी कामगिरी नोंदवल्याचे जाहीर करण्यात आले होते. विकास दराच्या वाढीतील ही सलग पाचवी घट होती. 197 नंतर अशी वेळ भारतात कधी उद्भवली नव्हती, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.