मुंबई – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त बुधवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायले जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. त्यानुसार, नागरिकांनी सकाळी अकरा वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
राज्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभागी असणार आहे. तसेच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.