मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-ए-मिलाद’ निमित्तानं शुभेच्छा दिल्या असून प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
‘ईद-ए-मिलाद’निमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्तानं साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचं संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’चा सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं, सोशल डिस्टन्सिंगंचं, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.